सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

साधारण दीड महिन्यापुर्वीची गोष्ट आहे .खूप दिवस मनात होत लिहायचं कोणी वाचू किंवा ना वाचू पण जे वाटलं ते सांगायचंय म्हणून लिहीत आहे.
माझा handsome मावस भाऊ सुरज सहजच घरी आला होता खूप दिवसांनी .. खरंतर त्याचं बोलणे मला खूप छान आणि पॉझिटीव्ह वाटतं. खुश असते त्याला भेटले कि त्यालाच काय पण सौरभ , श्रीधर भेटले कि पण छान वाटतं कंदाचीत मी आई वडिलांची एकुलती एक असल्यामुळे .. मुख्य म्हणजे बाहेरील जगाच्या अनेक गोष्टी कळतात . माहित नाही पण सुरज चा easy going , cool attitude भारीच वाटतो .आणि त्यात त्याचे मुद्देसूद बोलणे कधी कधी समोरच्याची योग्य पद्धतीने बोलती बंद करतो .
असंच खूप गप्पा झाल्या आणि तो निघाला. जाताना सहज म्हणाला मग कसा आहे अनुभव मुंबईचा , फरक कळला का पुणे आणि मुंबई माणसामध्ये . मुंबईची माणसे मदत करतात, माणुसकी असते . पुण्यातली पण वाईट नाहीत पण माणुसकीही नाही जवळजवळ . जेव्हा तो म्हणाला तेव्हा खूप राग आला आणि म्हणाले काही काय ... नाही वाटला असा काही फरक .. उलट तिथली लोकं किती robotic एकाच्या पण चेहऱ्यावर एक्स्प्रेशन नसतात . सारखे घाईतच असतात . कसं काय life एन्जॉय करतात कोण जाणे ... पुण्यातले बघ कसा life एन्जॉय करतात.. दार वीकेंड ला बाहे रouting , हॉटेलिंग किंवा movie पाहतात (सगळीच नाही काही पण शक्यतो ).. अगदी हौशी रसिक आहेत ..life कसं भरभरून जगतात ... तसंही आजकाल कुणाच्यातच माणुसकी दिसत नाही .. सगळे स्वतःचाच विचार करतात .. दुसऱ्यांना मदत करणे तर आता "out dated " झालाय न मुंबई तर कुणाला वेळ पण नसतो मदत करायला :)
सुरज माझ्या बोलण्यला ला हसत हसत म्हणाला ... कळेल ..... कळेल आणि असं बोलून घरी निघाला ...
नंतर २-४ दिवसात एक प्रसंग घडला. ..माझ्याबद्दल नाही पण तरीही मला खूप काही सांगून जाणारा ..
दिवस : धनत्रयोदशी २८/१०/२०१६
वेळ :साधारण ४:३० वाजता
ठिकाण : ठाणे स्टेशन
त्यादिवशी प्रगती ने पुण्याला जायचंच होता कारण दुसऱ्या दिवासापांसून दिवाळी सुरु होणार होती आणि माझा मन काही इथे रमत नव्हतं आणि घराचं ओढ पण खूप वाटत होती . अर्थात दिवाळी मुळे माझा नंबर वेटिंग लिस्ट ला होता पण १ तास अगोदर कन्फर्म तिकीट चा sms आला होत पण तरी खात्री करावी प्लॅटफॉर्म लिस्ट ला म्हणून लवकरच निघाले तसा अजून अर्धातास वेळ होता त्यामुळे मी बोर्ड वरची waiting list चेक करत होते .सगळे पेपर्स पहिले पण माझा नावाचं नव्हतं अगदी एकूण एक पेपर list चेक करत होते, अगदी खाली जमिनीवर पडलेले पण पेपर list पण बघत होते ani आश्चर्य करत होते मग कन्फर्म चा message कसा आला?? तिथली काही माणसे माझे एक्स्प्रेशन आणि असं वागणं पाहून आश्चर्याने बघत होते ( खूप वेळा नंतर कळलं मी तिकीट बुक तर "दादर to पुणे "केला होतं मग माझ्या नावाची list दादर ला दिसणार ना .. वेडेपणा माझा आणि काय :) ) शेवटी दमून तिथेच एका खांबाच्या बेंच वर बसले आणि ट्रेन ची वाट पाहत बसले
त्यादिवशी लोकल ला खूप गर्दी दिसत होती. संध्याकाळची वेळ त्यामुळे down ला तशीही गर्दी होती पण आज दिवाळी मूळे सगळ्या लोकल इतक्या भरलेल्या होत्या कि एखादा फुगा फुगतो तसा आणि कधी स्फोट होईल गर्दीचा असाच वाटत होतं. कर्जत ची लोकल तर इतकी भरली होती कि मी थोडी किंचाळतेच "बाप रे .!!!!. इतकी गर्दी !! " माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझ्याकडे पाहायला लागावी कि हिला काय झाले.. अशी गर्दी नॉर्मल च असते असेच तिचे एक्स्प्रेशन होते.
तेवढयात दुसरी लोकल आली कल्याण ला जाणारी .प्रचंड गर्दी होती इतकी कि उतरणारे खूप आणि तेवढेच चढणारे .. आणि लोकल तर अर्धा मिनिट थांबते. तेवढया माझ्या समोर थांबलेला डब्यातून उतरताना थोडा आवाज येत होता माणसांचा ओरडल्यासारखा आंणी कोणा माणसाला बाकीच्यांनी धरलेले मला वाटलं चोर आहे कि काय पण नंतर कळले एका माणसाला चक्कर आली म्हणून सगळ्यांनी पकडलंय तो पडू नये म्हणून. मग त्याला बाकीचा २-३ माणसांनी माझ्या समोरच्या खांबाच्या बेंच वर बसवलं आणि तिथेच एक २३-२४ वर्षांचा साधा गरीब मुलगा बसला होता त्याला म्हणाले ह्यांची काळजी घे आम्ही निघतो पुढची ट्रेन आहे तो पण म्हणाला मी बघते काळजी करू नका . मग बाकीचे सगळे निघाले .तो माणूस जवळ जवळ बेशुद्ध होता .चेहऱ्यावरून खूपच थकला ला होता. बहुकेत मध्यमवर्गीय नॉर्थ इंडियन होता एकंदर दिसण्यावरून आणि पेहरावावरून. ५ -१० मिन झाली तो जवळ जवळ बेशुद्ध होता असं वाटत होता त्याला आता attack येतो कि काय मी शेवटी न राहवून म्हणाले त्या मुलाला रेल्वे पोलीस ना बोलवा त्यांना ऍडमिट करा हॉस्पिटल मध्ये किंवा त्यांच्या घरच्याना कॉल करा. माझ्या शेजारी बसलेल्या हिंदी बोलणाऱ्या ऑंटी पण तेच बोलत होत्या तो मुलगा मात्र शांत होता म्हणाला थांबा थोड त्यांना शुद्धीवर तर येऊ दे. ५ मिन ने त्या माणसाला शुद्ध आली आणि तो पाणी पाणी म्हणत होता मग त्या मुलाने पाण्याची बाटली दिली .
पण त्याला खुपच तहान लागलेली मग शेवटी तो मुलगा मला म्हणाला "मॅडम प्लीज सामानाकडे आणि माणसाकडे लक्ष ठेवा मी लगेच येतो " मी म्हणाले ' डोन्ट वरी मी आहे इथे . मी लक्ष ठेवते." तो पर्यंत तो बरं नसलेला माणूस बेंच वरच झोपला २-३ मिन मुलगा पाण्याच्या बाटली घेऊन आला होता समोरचा माणूस आता शुद्दीवर होता बऱ्यापैकी त्या मुलाने पाण्याची बाटली दिल्यावर तो पैसे द्यायला लागला मुलाला पण त्याने घेतले नाही उलट अजून एक बाटली तुमच्याकडे ठेवा असं हिंदी मध्ये बोलत होता. त्याने पाणी पिले आणि अचानक त्याला उलटी झाली ती हि प्लॅटफॉर्म वरच . परत जेव्हा उलटी सारखं त्याला वाटलं तेव्हा तो प्लॅटफॉर्म वरच पण ट्रॅक जवळ गेला उलटी करायला नशीब!! मागून कुठली लोकल येत नव्हती नाहीतर तेव्हाच खेळ खल्लास झाला असता (कारण दर ३ मिन ट्रॅक वर एक तरी लोकल येतेच !).
२-४ उलटी झाल्यावर मात्र त्याला खूपच बारा वाटलं. आता चांगलाच जागा झाला होता मग त्या मुलाशी बोलत होता ... मुलगा म्हणत होता तुम्हाला घरी सोडू का पण तो माणूस म्हणाला मी आता ठीक आहे मी जातो एकटा ..मग त्याने रुमालाने तोंड स्वच्छ पुसले .चष्मा पुसला आणि एकदम शांतपणे जणू काहीच झालं नाही असा निघाला.. फक्त शिट्टी वाजवायची राहिली होती इतका cool पणे निघाला . ... आणि मी बघत राहिले
तो प्रसंग पाहून त्या मुलाचा कौंतुक वाटलं. म्हण्टलं तर साधाच प्रसंग काही खास नाही पण त्या मुलाने दाखवलेली माणुसकी आणि आणि त्या माणसाने तो प्रसंग सहज पचवला हे पाहून आश्चर्य वाटलं आणि आनंद पण वाटलला.
शेवटी ५:१० माझी लाडकी प्रगती एक्सप्रेस आली तो मुलगा बहुतेक त्याच गांधींची वाट पाहत होता कारण तो general डब्यात आणि मी ladies डब्यात चढले . मी तर कन्फर्म आणि तेही window सीट मिळाल्यामुळे खुश होते . तेवढ्यात एक ऑंटी ज्या थोड्यावेळापुर्वी प्लॅटफॉर्म वर शेजारी बसल्या त्या माझ्या जवळ आल्या आणि मोठ्या आवाजात हिंदी मध्य म्हणाल्या " वो आदमी गया क्या घर पे ठीक से ??? " . आजूबाजूचे सगळ्या बायका मुली माझ्याकडेच बघायला लागल्या . मी ऑन्टी ना एक मोठी smile दिली आणि म्हणाले " ऑन्टी , वो आदमी ठीक से खुद्द चलते चलते . गया .एकदम ठीकठाक होके .. वो लडके ने बहुत मदद की "... ऑन्टी पण खुश होऊन त्यांचा सीट वर बसायला गेली ..
माहित नाही पण त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य आणि खूपसं समाधान होतं ... :) मनातल्या मनात सुरज ला म्हणाले तुझंच बरोबर होतं. पण Half Truth कारण पुण्याची माणसांना माणुसकी नसते हे कुठं सिद्ध झालंय कदाचित हे सिद्ध करायला अजून एक प्रसंग घडला असावा..
*************************************
दिवस : शुक्रवार ०४/११/२०१६
वेळ :साधारण ३ वाजता
ठिकाण : " विष्णू जी कि रसोई " थाळी रेस्टॉरंट , एरंडवणें
त्या दिवशी काकाचा birthday असल्यामुळे फक्तं घरचे मिळून बाहेर जेवायचे ठरले. मी कटाक्षाने घरच्यांच्या बर्थडे बाहेर जातो. मजा म्हणून नाही पण त्या दिवशी सगळ्यांनाच विश्रांती म्हणून .. नाहीतर वर्षभर बाहेरचे जास्त खात नाही आम्ही ... अगदी हौशी पुणेकर असूनही ....
जरा हटके मेनू आणि बऱ्यापैकी जवळ म्हणून विष्णू जी कि .. ला जायचे ठरले .
खरंतर आज खूप उदास आणि चिडचिड होत होती त्यात reception वर असणारी मुलगी फोन वर बोलत होती आणि आमच्याकडे लक्ष देत नव्हती (कारण साधी माणसं ..श्रीमंत नाही ना ..) असं कोणी ignore केलं कि मला खूप राग येतो अजूनच चिडचिड होत होती पण राग कंट्रोल केला आणि कूपन घेऊन आत गेले . आतमधील ambiance खूप आवडला. साधाच पण ओपन space होता . सेल्फ सर्विस बुफे होतं जे मला नाही आवडत फारसं . पण जे आहे ते accept करणे भाग होतं . जेवणात खूप variety होती. मुगाचा हलवा,वांग्याची भाजी,शेवेची भाजी मूग आणि चवळी उसळ, नागपुरी वडाभात (जो थोडा शिळा वाटला ..सगळ्यांनाच ).. जवळ जवळ नागपुरी बेत पण पुण्याचा चवीचा ( इथे जास्त कोणी तिखट खात नाही )..चव तशी छान होती पण हळू हळू लक्षात आलं सगळंच खूप तेलकट आणि तुपकट आहे ज्याची आम्हाला अजिबात सवय नव्हती. पोळी ला पण आम्ही खूप कमी तेल वापरतो.असो .
जवळ जवळ ३ पर्यंत जेवण होत आलं होतं .. काकाचे पण जेवण संपलेलं तेवढ्यात काका म्हणायला लागला मला खूप चक्कर येतीये .. सुरुवातीला वाटलं असाच म्हणत असेन वय झाला कि माणूस थोडं झाला तरी खूप झालंय असं म्हणतो पण मग लगेच लक्षात आले त्याला खरंच चक्कर येतीये. मग जेवण अर्धवट टाकून उठले लगेच मी आणि हात धुतला. त्याच्या समोरच ताट दुसऱ्या टेबले वर ठेवली आणि त्याच्याशी बोलायला लागले. सारखा चक्कर येतीये असं म्हणत होता . आई ला सांगितलं कदाचित त्याचा लो बाप झालंय तू त्याची पल्स चेक कर मी काय करता येईन का बघते.रिक्षा बोलावते आई म्हणाली पल्स लागत नाहीये मग मात्र खूप घाबरले . २ मिन ब्लॅक झाले मग ठरवलं डॉक्टर कडे न्यायला पाहिजे अशा प्रसंगात आपण ऍम्ब्युलन्स ला फोने करतो पण मी वेडी रिक्षा आणायला धावले ( अशा प्रसंगात कधी कधी योग्य सुचत नाही ). एरंडवणं तास शांत भाग. त्यात दुपार त्यामुळे जास्त गाड्यांची गर्दी नव्हती शेवटी रिक्षा मिळाली त्याला विनंती केली २ मिन थांबा मी patient ला घेऊन येते. आत मध्ये गेले तर काका अजूनही बेशुद्ध होता मग लक्षात आले त्याला पाणी द्यावे मग बारा वाटेनं त्याने २ घोट नाही पिला आणि लगेच उलटी झाली जेव्हा उलटी झाली तेव्हा लगेच लक्षात आले हा तर ऍसिडिटी चा अटॅक आहे आता काका नक्की बारा होणार ( कारण मुंबई चा प्रसंग आठवला..त्या माणसाला उलटी झालव्यावरच बरं वाटलं) मी म्हणले आई ला २ मिन त्याला रेस्ट घेऊ दे मी रिक्षावाला अजून थांबलाय का बघून येते पण बाहेर आले तर रिक्षावाला गायब !!!!!
मग परत आतमध्ये "तानमान " बघायला गेले .काका बराच शुद्धीवर होता आणि बोलत पण होता मग हे पाहून रिलॅक्स झाले .तिथलं कॉ-ऑर्डीनटोर मग विचारायला लागला काय झालं . खरंतर इतक्या वेळ कुणाचा साधा लक्ष पण गेला नाही कि कोणी आम्हाला विचारायला आला नाही अगदी तिथे काम करणारे गांधी टोपी वाले वेटर पण धावून आले नाहीत. सगळी कडे एक कटाक्ष टाकला.. सगळे शांतपणे enjoy karat जेवत होते त्यातला एकाच पण लक्ष नव्हता हे शक्यच नव्हतं .. त्यातले अनेक जण श्रीमंत होते काही तर नवश्रीमंत इथे येणारे काही काही पुण्याचे तर काही नागपूर विदर्भाचे असतील पण एक जण मदतीला धावून ला नाही कि साधं विचारलं पण नाही हेल्प हवी का ? म्हणून... फक्त एक कॉ-ऑर्डीनटोर काकाला उलटी झाल्यावर विचारायला आला कारण त्याला त्याच्या रेस्टॉरंट च्या रेप्युटेशन ची पर्वा होती माणुसकी ची नाही !!!! माणसाचा एक चेहरा कळला ..... तो पाहून नकळत डोळ्यात पाणी आलं पण सावरल स्वतः ला आणि आई ला म्हणाले मी परत रिक्षा बघते डायरेक्ट हॉस्पिटला काकाला ने ( अजूनही ambulance बोलवावे सुचले नाही...... .हद्द झाली ..एक दम बत्थड आहे मी ..hopeless ) कारण मी स्कुटी टी वर आले होते रेस्तरॉ ला आणि बाकीचे रिक्शा ने. कॉ-ऑर्डीनटोर बोलले व्हील चेअर असेल तर बघा तो म्हणाला आहे मी म्हणाले मी रिक्षा बघते आणि मिळाली कि सांगायला येते. नशिबाने एक रिक्षा मिळाली मी त्याला तंबी दिली सोडून जाऊ नका... मी लगेच येते. एक मात्र बरं तो खरंच थांबला होता मग व्हील चेअर वर त्या कॉ-ऑर्डीनटोर ने थोड्या अंतरावर नेले मग पायरी होती मी म्हणाले दरवाजापर्यंत कुणाला याला सांगा हि विनंती आहे मग एक नोकर जो गांधी टोपी घातलेला कसाबसा तयार झाला मग दरवाजा ते रिक्षा मी आणि आई ने नेले .तो माणूस साधा रिक्षा पर्यंत पण आला नाही उलट झिडकारल्या सोडलं काकाला . ...
मग शेवटी डॉक्टर ना दाखवले ते म्हणाले ऍसिडिटी चा अटॅक आहे बाकी काही नाही ( कारण सकाळी काका नेहमी प्रमाणे नाश्ता न करता direct जेवला होता )
दुसऱ्या दिवशी आई ने सांगितलं .अगं वृंदा ..व्हील चेअर वरून दरवाज्यापर्यंत सोडायला तिथले कुठलेच नोकर तयार नव्हते सगळे म्हणाले आमचा काही हे काम नाही म्हणून पण त्या हायफाय कॉ-ऑर्डीनटोर ने शेवटी आणलं व्हील चेअर वरून दरवाज्यापर्यंत.. ...चांगला होता तो .. तेव्हा हसून तिला म्हणाले..ते काही माणुसकी म्हणून नाही आणला काही... त्यांना त्यांचा रेस्तरॉ च्या रेप्युटेशनची काळजी होती आणि अशी ब्याद(प्रसंग) लवकर बाहेर गेलेलीच हवी होती ह्यांना कारण कमी जास्त झाला तर त्यांच्या हॉटेल ची बदनामी व्हायची ..
आता मात्र माझ्या डोळ्यासमोर आता तो २३-२४ वर्षाचा गरीब मुलगा, तो मुंबई चा आजारी माणूस आणि सुरज आले आणि टचकन डोळ्यातून पाणी आले ...
हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही .. पुणे कि मुंबई हा वाद नको कारण माणुसकी हि वृत्ती आहे पण एक मात्र नक्की गरीब असो कि श्रीमंत मी दोन रूपे बघितली.. एक माणुसकी असलेली आणि एक माणुसकी अजिबात नसलेली ... ---- वृंदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा